नाटकाच्या मुख्य तालमीपूर्वी अनेक गोष्टी होतात.
कुणाला गाणं म्हणायचं असतं,कुणाला नक्कल करायची असते.
कोण कोडं घेवून आलेला असतो.तर कुणाला ‘आज काय झालं माहिताय..’
या सदरातलं ताजं ताजं काही ऐक
वायचं असतं.
तरुने त्या दिवशी ‘तहानलेला कावळा’ गोष्ट सांगितली.
सांगितली म्हणण्यापेक्षा सादर केली असंच म्हणावं लागेल.
त्याला ‘निसर्गचित्र’नाटकाचं नेपथ्य आयतंच मिळालं होतं.
कसं कोण जाणे पण त्याला काय काय सुचत गेलं.
वेगवेगळ्या ठिकाणी उभा रहात,उडत,पळत,बसत तो गोष्ट सांगत होता.
खूपच गमती केल्या.
"एक होता कावळा.त्याला खूप खूप तहान लागली होती.
पण त्याला पाणीच कुठे मिळत नव्हतं.विहिरीत पाणी नव्हतं.
तळ्यात पाणी नव्हतं.नदीवर गेला तर तिथे पण पाणी नव्हतं.
समुद्रावर गेला तर समुद्रात पण पाणी नव्हतं!"
‘समुद्रात पाणी नव्हतं’म्हटल्यावर त्यालाच हसायला आलं.
पण न थांबता त्याने ती गोष्ट छानच पूर्ण केली.
कावळ्याची युक्ती सगळ्यानाच आवडली!