Friday, June 17, 2011

निरुत्तर!



दिवसभर कसले कसले खेळ खेळत ,
गप्पा करत राहणारा तरू
इतका त्यात मग्न असतो
की मग खाणं, पाणी पिणं
या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नसतो.
तहान भूक हरवून जाणं म्हणजे काय
हे तर त्याच्या ह्या वागण्याकडे बघून
कळणारच.

मे महिन्यात खेळण्याच्या नादात पाणी न पिणार्‍या तरुला
रुपाली समजावून सांगायची,"पाणी पिल्यावर छानच वाटणार तुला.
उन्हाळ्यात खूप पाणी प्यायचं असतं अरे.." वगैरे,वगैरे.

परवा ती असंच पाणी प्यायचा आग्रह करीत होती.
तरू जे बोलला ते ऐकून मला त्याच्या वयाचा प्रश्नच पडला.
रुपाली म्हणाली सुध्दा, "पप्पा, हा असं काही बोलतो ना,
लोकांना तो खूप मोठा असावासा वाटतो."
तर.. तरू म्हणाला,
"पण आई आता उन्हाळा नाही आहे ,
आता तर पावसाळा आहे ना!"

निरुत्तर ना ?

No comments:

Post a Comment